प्रधान मास्तर नावाचा संस्कार

प्रा. ग. प्र. प्रधान यांचा जन्म झाला, तेव्हा लोकमान्य टिळकांचे निधन होऊन त्यांचा वारसा महात्मा गांधींनी समर्थपणे पेलायला सुरुवात केली होती. स

्वातंत्र्य चळवळीने भारलेल्या त्या काळाचे संस्कार एकविसाव्या शतकातही कृतार्थ आयुष्याची वाट दाखवण्यास कसे समर्थ आहेत, हे स्वत:च्या जगण्यातून प्रधान यांनी दाखवून दिले. शनिवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांचे पाथिर्वही त्यांनी समाजाच्या स्वाधीन केले होते. वरवर पाहता प्रधान चारचौघांसारखे मध्यमवगीर्य आयुष्यच जगले. या अर्थाने की सर्वसाधारण समाज ज्यामुळे चटकन दीपून जातो, अशी टोकाची कोणतीही कृती त्यांनी केली नाही. तो त्यांचा पिंंडही नव्हता. पण स्वत:च्या पिंडाशी इमान राखत त्याची ताकिर्क टोके गाठण्याच्या धैर्यातही ते कधी कमी पडले नाहीत. शिवाय हे सर्व आपण अंतमंर्नाची उमीर् म्हणून करतो आहोत, त्यातून आनंद घेत आहोत, तर त्याचे कौतुक कशाला, या वृत्तीने त्यांनी केले. नेटका प्रपंच करतानाही किती अंगांनी समाजोपयोगी ठरता येते, याचा त्यांचे आयुष्य हा सुस्थित, संवेदनशील आणि विचारी सामान्यजनांसाठी वस्तुपाठ ठरू शकतो. 'चले जाव' चळवळीत तुरुंगवास भोगताना त्यांनी विशीतल्या प्रेरणांना न्याय दिला. १९४४मध्ये ते तुरुंगातून सुटले, तेव्हा देशभक्तीच्या उमीर्ला तुरुंगातील आचार्य जावडेकर, आचार्य भागवत यांच्यासारख्यांच्या अभ्यासवर्गांमुळे व्यापक पाया लाभला होता. सानेगुरुजींच्या सहवासाने सदसद्विवेकबुध्दीचा आयुष्यभराचा राखणदार आयुष्यात आला होता. पण ते सुटून घरी आले तेव्हा वडील सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ती करताना एमए झाले आणि पुढे फर्गसनमध्ये इंग्रजीचे अध्यापक म्हणून विद्याथिर्प्रियही झाले.मात्र राजकीय-सामाजिक कामही चालूच होते. शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या, पण लोकशाही मार्गाच्या आग्रहामुळे कम्युनिस्ट विचारसरणीशी फारकत घेतलेल्या समाजवादी प्रवाहाशी त्यांची नाळ जुळली होती. पुढे पत्नीने आथिर्क जबाबदारी घेतली आणि प्रधान सक्रिय राजकारणात आले. त्यांनी पुण्याच्या पदवीधर मतदारसंघातून १९६६ साली विधान परिषदेची निवडणूक लढवली व जिंकलीही. आमदारपदाला न्याय देता यावा म्हणून आधी त्यांनी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला, हे त्यांचे वैशिष्ट्य. सक्रिय राजकारणही त्यांनी निष्ठेने निभावले. राज्यातील ग्रामीण जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याला भेट देणारे, विधान परिषदेत या प्रश्नांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा करणारे प्रधान आदर्श लोकप्रतिनिधित्वाचा मानदंड मानले गेले. आणीबाणीच्या काळात त्यांनी पुन्हा तुरुंगवास भोगला. १८ वषेर् आमदारपदी निवडून आल्यानंतर, इतरांना संधी मिळावी म्हणून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि प्रबोधनाच्या कामात ते गुंतले. सानेगुरुजींच्या 'साधने'च्या संपादकपदाची जबाबदारी १७ वषेर् त्यांनी पेलली. या काळातही अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन असो वा माहितीच्या अधिकारासाठीचे, प्रधानांनी रस्त्यावर उतरून त्यात सहभाग घेतला. सन २००१मध्ये मात्र त्यांनी साधनेच्या जबाबदारीतूनही स्वत:ला मुक्त केले आणि केवळ वाचन-लेखनात ते मग्न झाले. त्यांच्यासाठी वाचन हा आयुष्य समृध्द करणारा आनंद होता, तर लेखन हा संस्कारांचा प्रयत्न. त्यांचे विपुल लेखन याची साक्ष आहे. प्रधान यांची वैचारिक भूमिका स्पष्ट असली, तरी अनेक पर्यायी उत्तरांची शक्यता गृहीत धरणारी आणि न पटणाऱ्या उत्तरांचाही आदर करणारी. त्यामुळे राजकारणातही त्यांना शत्रू नव्हते. मला 'उपदव मूल्य' नव्हते एवढाच याचा अर्थ, असे ते मिश्किलपणे म्हणत. 'उदारमतवादी माणसाला मित्र असतात, पण त्याची धारही कमी असते. म. गांधींनी उदारमतवादाला सत्याग्रहाची जोड दिली म्हणून तिला धार आली', हे त्यांचे निरीक्षण. समाजवादी पक्षाचे जनता पक्षात विलीनीकरण ही चूक होती, कारण त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे निष्ठावान कार्यकतेर् राजकीय चळवळीतून मिळणाऱ्या आत्मविश्वासाला, बळाला मुकले आणि त्यांच्या कामांतून परिवर्तनाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता राजकीय संघटनेअभावी मावळली, ही कबुली देण्याचा प्रांजळपणा त्यांच्याकडे होता. मंडल आयोगामुळे वंचितांच्या आकांक्षांचा स्फोट होऊन सुखासीन व्यवस्थेला हादरा बसला हे चांगलेच झाले, हे मत प्रस्थापिताचा भाग होऊन मिळणाऱ्या उपभोगांविषयी निरीच्छ व्यक्तीचेच असू शकते. प्रधान यांची साथ आयुष्यभर या साधेपणानेच केली. स्वातंत्र्यसैनिक, आमदार, पुरस्कार म्हणून मिळालेले पैसे त्यांनी समाजोपयोगी कामांना वाटून टाकले. पत्नीच्या निधनानंतर घरही साधना ट्रस्टच्या स्वाधीन करून केवळ पुस्तके आणि कपड्यांनिशी ते सानेगुरुजी रुग्णालयात वास्तव्याला गेले. व्यक्तिगत आयुष्यात कृतार्थता, पण समतावादी ध्येयांची बाहेरच्या जगात वासलात लागताना पाहणे, या द्वंद्वातही ते निराश नव्हते; कारण समाजातील सत्प्रवृत्तींवरचा त्यांचा दुर्दम्य विश्वास. या विश्वासाला जागण्याची प्रेरणाही त्यांच्याच आयुष्याच्या रूपाने प्रधान मास्तर मागे ठेवून गेले आहेत.

No comments: